सातारा – महाराष्ट्र केसरी किताबासाठी बुधवारी संध्याकाळपासून मल्लयुध्द रंगले आहे. आज दुसऱ्या दिवशी गतविजेता हर्षवर्धन सदगीर, बालारफिक शेख यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला असून दुसर्या फेरीत हर्षवर्धनी झुंज आदर्श गुंड सेाबत तर , किरण भगतची सलामी वेताळ शेळके सोबत कुस्ती रंगणार आहे.
सातारा येथील शाहू क्रीडा नगरीतील आखाड्यात बुधवारी महाराष्ट्र केसरीच्या लढतीची पर्वणी पहिल्या दिवसापासून कुस्तीशौकिनांना पहाण्यास मिळत आहे. पहिल्या फेरीत बाय मिळलेल्या बाला रफिक शेख दुसर्या फेरीत लातूरच्या नवखा मल्ल भरत कराड दोन हात करणार आहे. संभाव्य विजेत्यांच्या यादीतील कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील – आदित्य मोहोळ विरूध्द खेळणार आहे.
यापूर्वी साताऱ्याचा मल्ल आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत पहिल्या फेरीच्या आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर गोंदियाच्या वेताळ (दादा) शेळके याने भगतला पराभूत केलं आहे. किरण भगत याला 3 गुण तर वेताळ शेळके याला 4 गुण मिळालेअवघ्या एका गुणाने किरण महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाहेर पडला.
मातीवरील आखाडयात 4 वर्षांनी पुनरागमन करणारा किरण भगत हा वेताळ शेळके विरूध्द झुंजताना दिसणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 78 मल्लांनी भाग घेतला असून गादी विभागात 40 तर माती विभागात 38 मल्लांच्या लढती होणार आहे.