मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात पूनरागमन करणार आहे, असा विश्वास रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने व्यक्त केला आहे.
2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर अनेकदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली व त्यात क्षमतेपेक्षा जास्त सरस खेळ करण्याचाही प्रयत्न केला. आता अद्याप मी किमान दोन वर्षे क्रिकेट खेळू शकतो, त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून सध्या प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे, असेही कार्तिक म्हणाला.