तळेगाव दाभाडे, दि. 17 – पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मोटारीने धडक दिली. या अपघातात मोटारीतील तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आढे गावाच्या हद्दीत घडली. राहुल बाळकृष्ण कुलकर्णी (वय 42 रा. गोंदवले जि. सातारा. सध्या रा. ठाणे), विजय विश्वनाथ खैर (वय 71 रा. रत्नशिल अपार्टमेंट, सोमवार पेठ, कराड ) व हेमंत हरिश्चंद्र राऊत (वय 39 पत्ता माहिती नाही) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली मोटारी (एमएच 04 जेएम 5349) ही आढे गावच्या हद्दीत आली असता भरधाव वेगात असलेल्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार समोर चाललेला ट्रक (आरजे 09 जिबी 3638) याला मागून जोरदार धडकली. ही धडक एवढी भीषण होती की मोटारीचा पुढील इंजिनाचा भाग कंटेनरच्या मागील चाकापर्यंत आत गेला. या अपघातात मोटारीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत्युमुखी पडलेले विजय खैर व राहुल कुलकर्णी हे सासरे जावई होते. तर राहुल कुलकर्णी व हेमंत राऊत हे एकाच खाजगी कंपनीत कामाला होते. कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्याला चालले असताना हा अपघात घड