नवी दिल्ली – निवडणुकीमुळे चर्चच्या असणाऱ्या आसाम या ईशान्येकडील राज्याची बरीच वैशिष्ट्ये आहेत. इथे पर्यटनाचीही खूप ठिकाणे आहेत. मात्र, या राज्यात एक असेही ठिकाण आहे, जिथे दरवर्षी हजारो पक्षी येऊन चक्क आत्महत्या करतात. होय, आसामच्या दिमा हसो जिल्ह्याच्या टेकडीवर वसलेली जटिंगा व्हॅली पक्ष्यांच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पक्ष्यांच्या आत्महत्येमुळे जटींगा गाव हेडलाईन बनते. केवळ स्थानिक पक्षीच नाही तर स्थलांतरित पक्षी देखील या ठिकाणी पोहोचतात आणि आत्महत्या करतात. यामुळे, जटिंगा गाव हे एक अतिशय रहस्यमय गाव मानले जाते. चला तर, जाणून घेऊया याचे रहस्य.
आत्महत्या करण्याची प्रवृत्ती मानवांमध्ये सामान्य आहे, परंतु पक्ष्यांच्या बाबतीत हे पूर्णपणे भिन्न आहे. जटिंगा गावात पक्षी वेगानं उडतात आणि इमारतीत किंवा झाडावर आदळतात आणि ठार होतात. हे एकाच नव्हे तर हजारो पक्ष्यांच्याबाबतीत होते. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हे पक्षी संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच असे करतात. तर सामान्य हवामानात हे पक्षी दिवसा बाहेर जाऊन रात्रीच्या वेळी घरट्याकडे परत जातात.
स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या जवळपास 40 प्रजाती या आत्महत्येच्या शर्यतीत सहभागी आहेत. नैसर्गिक कारणांमुळे नऊ महिने जटिंगा गाव बाह्य जगापासून अलिप्त राहते. इतकेच नाही तर जटींगा खोऱ्यात रात्री प्रवेश करण्यास मनाई आहे. पक्षी तज्ञांचा असा विश्वास आहे की चुंबकीय शक्ती या रहस्यमय घटनेचे कारण आहे.
ओलसर आणि धुके असलेल्या हवामानात, वारे वेगाने वाहतात. म्हणून पक्षी रात्रीच्या अंधारात दिव्याभोवती उडतात. प्रकाश नसल्यामुळे, ते स्पष्ट दिसत नाहीत, ज्यामुळे ते इमारत किंवा झाडे किंवा वाहनांना धडकतात. अशा परिस्थितीत, लाईट येत नाही म्हणून संध्याकाळी जेटिंगा गावात गाड्या चालविण्यास मनाई होती. तथापि, असे असूनही पक्ष्यांच्या मृत्यूचा क्रम कायम राहिला आहे.
जटींगा गावचे लोक या घटनेमागे गूढ शक्तीचा हात मानतात. गावच्या लोकांद्वारे असे म्हटले जाते की वाऱ्यातून काही बाहेरची शक्ती येते, ज्यामुळे पक्षी तसे करतात. त्यांचा असा विश्वास आहे की या काळात मानवी वसाहतीमधून बाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान जटींगाचे रस्ते संध्याकाळी ओसाड बनतात.
कथितपणे, पक्ष्यांची आत्महत्या 1910 पासून चालू आहे, परंतु 1957 मध्ये बाहेरील जगाला याची माहिती मिळाली. सन 1957 मध्ये पक्षीशास्त्रज्ञ ई.पी. जी ( E . P. Gee ) काही कामानिमित्त जटींगा येथे आल्या. यावेळी त्यांनी स्वत: ही घटना पाहिली आणि आपल्या ‘द वाइल्डलाइफ ऑफ इंडिया’ या पुस्तकात त्याचा उल्लेख केला. या घटनेवर भारत व परदेशातील अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे, परंतु नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.