मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी हे बंड होणारच होते असे उत्तर दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे मला जराही आश्चर्य वाटले नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तयार झालेली राजकीय स्थिती आश्चर्य वाटण्यासारखी नाही. असे ते म्हणाले.
हे सरकार पडणार आहे…
निवडणून आलेले आमदार विचार करता, अशी आघाडी कधीचं झाली नसती. महापालिका , जिल्हापरिषदा निवडणुकांना सामोर जायचं.अनैसर्गिक अशी आघाडी होती, असं ते म्हणाले आहेत. उदयनराजेंना पुढे भाजप राज्यपालांकडे कधी जाणार ? असा प्रश्न विचारला हा प्रश्न पत्रकाराने इंग्रजी मधून विचारला होता त्याला उत्तर देतानाही उदयन राजेंनी इंग्रजीमधून सुरुवात केली . ते म्हणाले सी.. (बघा).. आणि नंतर पुन्हा हिंदीत त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. पक्षाचे वरीष्ठ लोक याबाबत ठरवतील, आणि निर्णय घेतील, असे उत्तर त्यांनी दिले. पण एक निश्चित आहे, हे सरकार पडणार आहे. हा सगळा नंबरगेम आहे. नंबर ज्याच्याकडे तो सत्तेत येणार, असं उदयनराजे यांनी म्हंटल.