नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारले आहे. शिवाय त्यांच्यासोबत 50 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. हे सर्व आमदार आसाम येथिल गुवाहाटी येथे असल्याचे समजते आहे. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मुंबईमध्ये येण्यास सांगितले आहे. शिवाय राज्यात काही ठिकणी बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मात्र साताऱ्यातील शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले हे बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी गुवाहाटी ला गेले होते त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Assam | Sanjay Bhosale, deputy district chief of Shiv Sena from Maharashtra's Satara, arrives in Guwahati, urges party MLA Eknath Shinde to return to 'Matoshree'
Shiv Sena has given a lot to its MLAs. They should return to 'Matoshree', he says. pic.twitter.com/GiF7D7qBSF
— ANI (@ANI) June 24, 2022
आमदारांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले हे त्या हॉटेलजवळ पोहोचले होते. मात्र त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले हे या आमदारांना परत मुंबईमध्ये परतण्याचे आवाहन करणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेनेच्या गटात आता अवघे 13 ते 14 आमदार राहिल्याची माहित समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांचा शिवसैनिकांशी संवाद
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळेला आक्रमकपणे हा संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपले मुख्यमंत्रीपद अमान्य असणं ही राक्षसी महत्वाकांक्षा असल्याचे ते म्हणाले.
विठ्ठल आणि बडव्यांवर जे बोलतायत त्यांचा मुलगा खासदार असल्याची टीकाही उद्धव यांनी केली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावने लागेल. असे ते म्हणाले. मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हण्टलं आहे. हे सगळं भाजपने केलं आहे. त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. माझा फोटो शिवसेनेचं नाव न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आणि मंत्र्यांना दिले आहे.