साउथ फिल्म इंडस्ट्रीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. बाहुबली, आरआरआर आणि पुष्पा-2 या तेलगू चित्रपटांनी देशभरातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच, अलीकडच्या काळात इतर सिनेमांपेक्षा टॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्सना जास्त प्रेक्षक मिळत आहे. यामुळेच टॉलिवूड स्टार्स एका चित्रपटातून कोटयवधींची कमाई करतात.
सध्याच्या पिढीतील स्टार्समध्ये प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे. संपूर्ण भारतातील क्रेझचा विचार केला तर बाहुबली स्टारचे नाव घेतले जाते. राजामौली दिग्दर्शित चित्रपटातून त्याला जगभरातून खूप पसंती मिळाली आहे. रिपोर्टसनुसार, 2022 मध्ये त्यांनी राधेश्यामसाठी 100 कोटी रुपये आणि आदिपुरुष या आगामी चित्रपटासाठी 150 कोटी रुपये आकारले आहेत. सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या बाबतीत त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.
स्टायलिश स्टार अल्लू अर्जुननेही पुष्पाच्या यशानंतर मानधन वाढविले आहे. तसेच सुपरस्टार महेश बाबूने “सरकार वारी पाता’साठी तब्बल 45 कोटी रुपये मानधन घेतले.
“बिग बॉस’ने रेव्हेन्यू माध्यमातून कोट्यवधीची कमाई
सर्वांचे मनोरंजन करणारा “बिग बॉस’चा सीझन-16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो आहे. तसेच, सलमान खानने या शोचे होस्टिंग केले असून, शो यशस्वी करण्यात सलमान खानची भूमिका महत्त्वाची आहे. “बिग बॉस’चे वैशिष्टय म्हणजे हा रिएलिटी शो देशातील सर्वात मनोरंजक आणि प्रसिद्ध चेहऱ्यांना एका छताखाली आणण्यासाठी ओळखला जातो.
हा शो “बिग मनी गेम’ आहे, यात शंका नाही. तसेच, ब्रॅंड, स्पॉन्सरशिप, फिल्म प्रोमोशन यांसारख्या अनेक माध्यमातून या शोची कमाई होते. गतवर्षी “बिग बॉस’ ओटीटीने 120 कोटींची कमाई केली. अशातच, शोची लोकप्रियता जसजशी वाढत गेली तशी कमाईतही भरघोस वाढ झाली.
“बिग बॉस’चा होस्ट म्हणून सलमान खानची उपस्थिती केवळ प्रेक्षकांना आकर्षित करण्यापुरती मर्यादित नाही, तर सुपरस्टार स्वतः एक ब्रॅंड व्हॅल्यू बाळगतो. ज्यामुळे अनेक ब्रॅंडचे लक्ष वेधले जाते. ‘”बिग बॉस’ आज एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे जिथे प्रत्येक गोष्ट एकाधिक बनते, मग ते मनोरंजन असो किंवा पैसा. अशातच, प्रत्येक सीझनसोबत “बिग बॉस’मध्ये वाढ होताना दिसत असून त्यातील गुंतवणूकही वाढत आहे.
लोकांचे कामाऐवजी वैयक्तिक लक्ष – नर्सिग
“रॉकस्टार’ अभिनेत्री नर्गिस फाखरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ताज्या मुलाखतीत नर्गिस फाखरी अनेक गोष्टींबद्दल थोडी रागावलेली दिसली. अभिनेत्री म्हणते की तिला तिचे आयुष्य खासगी ठेवायचे आहे. पण इंटरनेटमुळे आता सेलिब्रिटींचे आयुष्य उघड्या पुस्तकासारखे झाले आहे.
नर्गिसने तिच्या आयुष्याबद्दल सांगितले की, सामान्य माणसाप्रमाणे सेलिब्रिटींनाही त्यांच्या काही गोष्टी खासगी ठेवायच्या असतात. पण त्यांच्या गोष्टी कायम लपवून ठेवणे शक्य नसते. याशिवाय त्यांचे आवडते सेलिब्रिटी कोणाला डेट करत आहेत हे जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. यावर वृत्तमाध्यमांशी बोलताना नर्गिस म्हणते, ‘मी प्रामाणिक आहे. जर लोकांनी मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले तर मला त्यात काही अडचण नाही. पण मुद्दा असा आहे की लोक कामाऐवजी वैयक्तिक लक्ष केंद्रित करतात.
मला वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यात काहीच अडचण नाही, पण मला माझ्या कामावर प्रकाश टाकायला आवडेल. असे बरेच लोक आहेत जे आपल्या आयुष्याबद्दल बोलण्यास कचरतात किंवा त्याबद्दल अजिबात बोलायचे नाही. हे ठीक आहे. आपण त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे, असे नर्गिस म्हणाली.