छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सत्तांतरानंतर मोठ्या घडामोडी घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. एवढेच काय तर शिंदेसह बंडखोर आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला. यावरून अनेक आरोप- प्रत्यारोप झाले.
या संपूर्ण घडामोडीवर एका तरुणाने रॅप सॉंग केले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या मराठी गाण्यामध्ये ’50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन’ अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणी अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. राज मुंगासे असे या तरुणाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वीच या तरुणाच्या गाण्याचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर करत त्याचे कौतुक केले होते. तसेच त्याच्यावर कारवाई होण्याची भीती देखील वर्तवली होती. त्यानंतर काल ट्वीट करत आव्हाड म्हणाले की, ‘राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखील घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं.’
राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50… pic.twitter.com/9IOz4XUZ5X
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 6, 2023
’50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही,’ असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राम मुंगासेची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हंटले आहे.