नवी दिल्ली – 195 दिवसांनंतर, गुरुवारी देशात कोरोनाचे 5,335 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी 23 सप्टेंबर रोजी 5,383 रुग्ण सापडले होते होते. कोरोना प्रकरणांचा हा वाढता वेग पाहता आता केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज दुपारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
4 एप्रिल रोजी देशात कोरोनाचे 3038 नवीन रुग्ण आढळले आणि 5 एप्रिल रोजी 4,435 नवीन रुग्ण आढळले. याची खबरदारी म्ह्णून केंद्र सरकराने पावले उचलायला सुरुवात केली होती. आधीच्या काही वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा कॉरोन पसरू नये याची खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणा हालचाल करत असलयाचे समजते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की सक्रिय रुग्णांची संख्या 25,587 वर पोहोचली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू
कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन मृत्यूही कोरोनामुळे झाले आहेत. केरळ आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4,47,39,054 लोकांना या आजाराची लागण झाली आहे. एकूण संक्रमित रुग्णांपैकी सक्रिय प्रकरणांची संख्या 0.06 टक्के आहे.
दैनिक संसर्ग दर 3.32 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 2.89 टक्के होता.तर देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोरोनाविरोधी लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.या सर्व बाबी लक्षात घेता आरोग्य यंत्रणा आता राज्यांना काय निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.