नागपूर – लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल म्हणून समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील नेते प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनीही निवडणूक निकालावर भाष्य केले आहे. सेमिफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (4 state election result)
वडेट्टीवार म्हणाले की, मागच्या वेळी सेमिफायनल आम्ही जिंकलो; पण फायनल हरलो. तसेच आता सेमिफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun kharge) यांनी प्रचंड मेहनत घेतली. आम्ही या पराभवाने खचून जाणार नाही. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत आणि लढत राहू, असेही ते म्हणाले. (Loksabha semifinal)
तेलंगणाच्या यशाचे श्रेय राहुल यांना
तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी (Revanth reddy) यांना तुरुंगात टाकले होते. मुलीच्या लग्नालाही सोडले नव्हते. हे जे काही सूडाचे राजकारण आहे, त्यामुळं तिथल्या लोकांचा राग होता. हे एक कारण आहे. तसेच राहुल आणि प्रियंका (Rahul-Priyanka) गांधींच्या सभांना तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. पक्षानंही खूप मेहनत घेतली. त्यामुळे तेलंगणात हे यश मिळाले, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
फडणवीसांचा काँग्रेसला टोला
आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळलं असेल. निवडणूक निकालात ते दिसून आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री आहे. “जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच हे यश आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्यासाठी काम करतं आहे. त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहण्यास मिळालं हा त्याचा विजय आहे” असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटल आहे. (Bjp Vs congress)