T20 WorldCup । टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असे अनेक फलंदाजांनी अविश्वसनीय अशा स्फोटक खेळी खेळल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ख्रिस गेल, आंद्रे रसेल, हार्दिक पांड्या, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस लिन, जॉनी बेअरस्टो, रोहित शर्मा, युवराज सिंग आणि कायरान पोलार्ड यांसारख्या खेळाडूंची नावे समोर येतात. या सर्व फलंदाजांनी टी-२० क्रिकेटमध्ये अनेक जबरदस्त स्फोटक खेळी खेळल्या आहेत.
२० षटकांच्या या फॉरमॅटमध्ये जलद गतीने फलंदाजी करणाऱ्या फलनदाजांना अत्यंत महत्व दिले जाते. कारण यामध्ये फलंदाज कमीत कमी चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच चाहत्यांना टी-२० क्रिकेट आवडते, कारण या फॉरमॅटमध्ये फलंदाजांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन होते.
टी-२० क्रिकेटमध्ये मध्ये वेगाने धावा करण्यासाठी फलंदाज षटकारांवर अधिक भर देतात. टी-20 विश्वचषकमध्येही ( T20 WorldCup ) अनेक फलंदाजांनी मोठ्या प्रमाणात षटकार मारले आहेत. त्याप्रमाणे भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी भारताकडून सर्वात जास्त षटकार ठोकले आहेत.
#INDvsPAK | राष्ट्रगीत संपल्यानंतर रोहित शर्मा झाला भावुक, पहा ‘हा’ व्हिडिओ…
टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज
१) युवराज सिंग – २००७ मध्ये भारतीय संघाने पहिलाच टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup ) जिंकला होता. त्यावेळी भारताच्या विजयात युवराज सिंगचे योगदान सर्वात महत्त्वाचे होते. त्या विश्वचषकात युवराज सिंगने अनेक शानदार खेळी खेळून भारताला विश्वविजेता बनवण्यात योगदान दिले होते. २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक षटकार युवराज सिंगने मारले आहेत. २००७ ते २०१६ या कालावधीत युवराजने भारतासाठी टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup ) स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळले आहेत. या काळात त्याने भारतासाठी सर्वाधिक ३३ षटकार मारले आहेत.
२) रोहित शर्मा – भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा २००७ मधील विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्यावेळी स्पर्धेत रोहितने चांगली कामगिरी केली होती. २००७ ते २०२१ पर्यंत त्याने टी-२० विश्वचषकमध्ये ( T20 WorldCup ) ३३ सामने खेळले आहेत. यादरम्यान रोहित शर्माने ३० डावात ३१ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माने टी-२० विश्वचषकात आत्तापर्यंत ८४७ धावा केल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३१.५२ असा राहिला आहे.
३) विराट कोहली – भारताकडून सर्वात जास्त षटकार मारण्याच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली जेव्हा खेळपट्टीवर येतो तेव्हा त्याला सुरुवातीला वेगाने धावा करण्यास थोडा वेळ लागतो. मात्र एकदा खेळपट्टीवर चांगल्याप्रकारे रुळल्यानंतर विराट कोहली त्याच्या गरजेनुसार अतिशय वेगाने संघाची धावसंख्या वाढवतो. कोहलीने २०१२ ते २०२१ या कालावधीत टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup ) स्पर्धेत एकूण २१ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २० षटकार मारले आहेत. विराट कोहलीने टी-20 विश्वचषकमध्ये आतापर्यंत ८४५ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १२९.६० असा राहिला आहे.