मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. सध्या राज्यात शिंदे सरकार असल्याचं दिसून येत आहे. या घटनाक्रमाला अजून वर्ष सुद्धा झालेले नाहीत. आणि अश्यातच आता उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहे.
सध्या राज्यात नेत्यांच्या फोन टॅपिंगचा प्रकार वाढला असून, उद्धव ठाकरेंनी देखील सावध भूमिका घेत पक्षातील नेते, उपनेते, आमदार आणि खासदारांना आता फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, ‘आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या असल्याचे दानवे म्हणाले.
अनेकदा बोलताना चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा नंतर गैरवापर करण्यात येतो. म्हणून सर्वांना आयफोन वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.’ असं देखील दानवे यावेळी म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.