नागपूर – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) लढ्यानंतर जरांगे विरुद्ध भुजबळ (Jarange vs bhujbal) असा संघर्ष सुरु झाल्याचे पाहायला मिळाले होते. सध्या जरांगे हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन मराठा बांधवांना संबोधित करत आहेत. तर मंत्री छगन भुजबळ हे देखील ओबीसी आरक्षणासाठी (Obc reservation) ठिकठिकाणी सभा घेताहेत. अशात “सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत आहेत त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही उपायांची गरज आहे असं मला वाटत नाही असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. (Shinde fadanvis sarkar)
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ज्या मराठ्यांकडे निजाम काळातील महसूल किंवा शैक्षणिक विभागाची कुणबी अशी नोंद असलेली कागदपत्रे असतील त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. मराठ्यांच्या समावेशाचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल का, असे विचारले असता भुजबळ यांनी उपरोधिक टोला लगावला, (Kunabi certificate)
भुजबळ म्हणाले की, सर्व मराठा समाज कुणबीचे दाखले घेऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यामुळे आता वेगळे काही करण्याची गरज नाही असे वाटते. सर्वच मराठे कुणबी होत असतील तर महाराष्ट्रात एकही मराठा उरणार नाही. भुजबळ म्हणाले की तुम्ही क्युरेटिव्ह पिटीशन करा की दुसरे काही विधेयक आणा.”
भुजबळ पुढे म्हणाले,”सर्वच जण कुणबी होणार असतील तर खाली कोण मराठा उरणार आहे? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत नागपुरात होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण हा एक प्रमुख मुद्दा असणार आहे. त्या संबंधात भुजबळ आज पत्रकारांशी बोलत होते.