नवी दिल्ली – संबंधित समाजाने स्वतः पुढाकार घेऊन सांगितल्याखेरीज अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तिगत कायद्यात कोणताही बदल न करण्याचे सरकारचे धोरण आहे. अर्थात, बौद्ध, शीख व जैन यासारख्या बहुसंख्य धर्मीयांच्या गटातील व्यक्तिगत कायद्याला व्यापक स्वरूप देण्याची उपाययोजना या आधीच केली आहे, ही माहिती कायदा न्याय व कंपनी व्यवहार खात्याचे राज्यमंत्री नीतिराजसिंग चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
पुणे-नासिक अविलंब ट्रंक कॉल सेवा सुरू पुणे – पुण्याहून नासिक शहर, नासिक रोड व देवळाली या शहरांबरोबर टेलिफोनची अविलंब ट्रंक कॉल सेवा सुरू झाली. पुण्याचे महापौर शांताराम दिवेकर यांनी नासिकचे जिल्हाधिकारी शरद केळकर यांना पहिला ट्रंक कॉल करून उद्घाटन केले.
जग शांततेच्या नजीक ओटावा – कॅनडियन पंतप्रधान ट्रुडो यांनी राष्ट्रकुल पंतप्रधान परिषदेचे उद्घाटन करताना असे सांगितले की, आज जग शांततेच्या जितके जवळ आले आहे तितके ते कधीच आले नव्हते. याचे कारण जगाला हे समजून चुकले आहे की, सामर्थ्याच्या जोरावर मानवजातीचं प्रश्न सुटू शकत नाहीत. बांगला देशचे पंतप्रधान शेख रहमान यांचे ट्रुडोंनी स्वागत केले. फक्त पाकिस्तान आजच्या परिषदेशाला हजर नव्हते. कारण बांगला स्वतंत्र होताच पाकने आपले अंग राष्ट्रकुलातून काढून घेतले.
आजपासून दुकाने उघडणार
पुणे – किरकोळ व्यापाऱ्यांनी शनिवारपासून दुकाने उघडावीत, असा निर्णय आज व्यापाऱ्यांच्या संघटनेने घेतला. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला असला तरी, भाव निश्चित करून माल दिला जात नाही तोपर्यंत नवी खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.