जयपूर – शेती करणाऱ्या माणसांची संख्या कमी होत चालल्याने, काही दिवसांनी एकवेळ अशी येईल की लोकांकडे पैसे असतील पण खरेदी करण्यासाठी बाजारात कृषी उत्पादनेच नसतील असा इशारा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिला आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे त्या अनुषंगाने त्यांनी हे विधान केले आहे. तोमर हे चौधरी चरणसिंग राष्ट्रीय कृषी विपणन संस्था, जयपूर (राजस्थान) च्या चौथ्या दीक्षांत समारंभात संबोधित करत होते.
ते म्हणाले की, आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या देशासाठी कृषी क्षेत्र आवश्यक आहे. वाढलेले भौगोलिक क्षेत्र, विविध हवामानाचे क्षेत्र आणि शेतीवर अवलंबून असलेली वाढती लोकसंख्या आपल्यासाठी एक आव्हान आहे. शेती क्षेत्रातील लोकांची कमी झालेली आवड हे शेतीपुढील प्रमुख आव्हान आहे.
बिहारमध्ये राजकीय भूकंप,उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ; भाजपाने….
पैसा मिळवण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध झाल्यामुळे शेतीशी निगडित लोक कमी झाले आहेत. त्यामुळे एक वेळ अशी येईल की लोकांच्या खिशात पैसे असतील पण खरेदी करण्यासाठी बाजारात शेतीमालच उपलब्ध नसेल.
राज्यात 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री शिंदे
तोमर म्हणाले, शेतीविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी, आम्ही अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न करीत आहोत. आम्ही खर्च कमी करण्याचा आणि शेतीमध्ये नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत. अन्न, आणि औषधांसाठी निम्मे जग भारतावर अवलंबून आहे. उदरनिर्वाहासाठी नोकरी आवश्यक आहे, परंतु शेतीला योग्य स्थितीत आणणे ही देखील आपली जबाबदारी आहे.