मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राऊत यांच्या अडचणी वाढल्याच दिसून येत आहे. महाष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. त्यावेळी सरकारविरोधी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता संजय राऊत ट्वीट करत पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे. व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे.’
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी… pic.twitter.com/I3jqIT8BuH
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 15, 2023
‘बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला.. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.’ माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी पोलिसांवर दबाव आणला, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
महाष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालनंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, ” असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं.