आंदोलनातील घोषणांवर मनु सिंघवींचा आक्षेप
नवी दिल्ली : देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता या आंदोलनात देण्यात येणाऱ्या घोषणांवरून आक्षेप घेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी, कायद्याच्या विरोधात आंदोलनामध्ये स्वातंत्र्याचे घोषणा, नारेबाजी करू नये यामुळे आपला मुळ मुद्दा बाजूला राहिल असे सांगत यावर आक्षेप घेतला आहे.
कॉंग्रेस नेते मनु सिंघवी यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भारत माता स्वातंत्र्य, काश्मीर स्वातंत्र्य अशा घोषणा वापरू नयेत, यामुळे कामगिरी कमजोर होते. सिंघवी यांनी, ‘ भारत मातेकडून स्वातंत्र्य, काश्मीरमधून स्वातंत्र्य अशा प्रकारच्या घोषणा अनादर करणाऱ्या घोषणा आहेत.त्यामुळे अशा घोषणांना सीएए विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनात कोणतेही स्थान नसावे. अशा घोषणा देशावर प्रश्न निर्माण करतात आणि सीएएविरूद्ध सुरू असणारी चळवळ कमकुवत करण्याचे काम करतात, असे म्हटले.
विशेष म्हणजे 2016 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घोषणा नंतर ‘आझादी नारा’ भारतीय राजकारणाच्या चर्चेत आला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात पक्षाच्या नेत्यांनी, जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्यावर आंदोलनाच्या नावाखाली आझादीचे नारे देण्याचा आरोप केले होते.अलीकडेच दिल्लीच्या जेएनयू आणि जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन छेडले असता स्वातंत्र्याचा नारा देखील ऐकू आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘दिल्ली पोलिसांकडून स्वातंत्र्य … संघवादापासून स्वातंत्र्य’ अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. याशिवाय आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.