भोपाळ – कर्नाटक राज्यात हिजाबवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरून वाद इतका पेटला की, हे प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचलं आहे. यावर आता आता, खासदार प्रज्ञा ठाकूर यांनीही हिजाब वादावर प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली असून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी बोलतांना प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या,'”त्यांच्या घरात सुरक्षित नसलेल्यांना हिजाब घालण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणालाही हिजाब परिधान करण्याची आवश्यकता नाही. महिलांनी घरातच हिजाब घालावा, विशेष समाजात मुली-बहिणींवर वाईट नजर ठेवली जाते. तेथे स्त्रियांचा सन्मान केला जात नाही. या विशेष समुदायात आपल्याच घरातील बहिण आणि घरातच लग्न केले जातात. त्यामुळेच त्यांना घरातच हिजाब घालण्याची गरज आहे.’
ते पुढे म्हणाले,’हिजाब म्हणजे आपला चेहरा लपवणे. आणि भारतात याची गरज नाही. त्या पुढे म्हणाल्या, मस्जिदमधून होणाऱ्या नमाज पठणच्या अजानवरही आक्षेप घेतला होता. सकाळी सकाळी लोकांची झोपमोड करण्याचं काम या अजानमुळे होते, साधु-संतांची साधना भंग होते’ असेही ठाकूर म्हणाल्या आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये एका मुस्लीम युवतीसमोर धार्मिक घोषणा देण्याचं लाजिरवान कृत्य भगवा गमछा गळ्यात परिधान केलेल्या युवकांच्या टोळक्याने केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत युवतीने देखील “अल्लाहू अकबर”च्या घोषणा दिल्या. या घटनेमुळं देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.