मुंबई : पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः पश्चिम कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
पुढील ४-५ दिवस पश्चिम कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता संबंधित जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी. आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या आहेत. pic.twitter.com/RBY8CqMvuq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 8, 2022
कालही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडेदेखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले आहेत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 8, 2022
तसेच पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.