नाशिक- मराठवाड्यामध्ये (Marathwada)अत्यंत शांततेच्या मार्गाने जर, मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी आंदोलन करत असतील तर मग राज्यामध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्या बाह्य शक्ती कोण?, त्यांची छायाचित्रे प्रसार मांध्यमांमधून झळकत असतानाही त्यांच्यावर का कारवाई होत नाही? अशा समाजकंटकांवर तातडीने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत राज्यसरकार सकारात्मक विचार करत आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील व त्यांचे सहकारी शांततेत आंदोलन करत असून खुद्द जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार कोणीही हिंसक आंदोलन करू नये व शांतता पाळा, असे आवाहन केले जात आहे.
असे असतानाही राज्यामध्ये काही ठिकाणी हिंसक आंदोलन होत असून आजी-माजी लोकप्रतिनिधींचे घरे बंगले व वाहने पेटवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. जे करत आहेत त्यांचे छायाचित्रे तसेच व्हिडिओ सोशल मीडिया तसेच चॅनल मधून उघडपणे दिसत आहेत. आंदोलनाला बदनाम करणाऱ्या या व्यक्ती कोण असून अशा समाज कंटकांवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे, हे समजत नसल्यामुळे, काही समाज विधातक प्रवृत्तींना बळ मिळत आहे. ही बाबलक्षात घेत चुकीच्या पद्धतीने आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.