मुंबई – उत्तरप्रदेशात परत आलेल्या स्थलांतरीत मजुरांना लॉकडाऊन नंतर पुन्हा आपल्या राज्यात कामावर घ्यायचे असेल तर संबंधीत राज्यांनी उत्तरप्रदेश सरकारची अनुमती घेतली पाहिजे, अशी भूमिका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी घेतली आहे त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे.
उत्तरप्रदेश सरकारची अशी भूमिका असेल तर आता तेथील कामगारांना महाराष्ट्रात परत पाठवताना आधी महाराष्ट्र सरकारची आणि पोलिसांची अनुमती घ्या, अशी सूचना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारनेही त्या संबंधात गंभीर भूमिका घेतली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
परराज्यातील कोणतेही मजूर पुन्हा महाराष्ट्रात येऊन काम करू इच्छित असतील तर या मजुरांचे नियमीत रजिस्ट्रेशन करावे, संबंधित कामगारांनी आपली कागदपत्रे व फोटो सादर करावेत असेहीं राज ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.