मुंबई – अतिवृष्टीने बेजार झालेल्या, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे सर्वप्रथम लक्ष द्या आणि तात्काळ मदत व पुनर्वसन कार्य सुरू करा, असा विशेष प्रस्ताव आज आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने सभागृहात आणला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जयंतराव पाटील यांनी माध्यमांना दिली.
शेतकऱ्यांना दिलेली मदत कागदावरच आहे. काम कमी बोलणे जास्त असे सरकारचे काम सुरू आहे, सरकारमधील खाती मिळवण्यातच सगळे गुंतलेले असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेकडे सरकारचे लक्ष नसल्याचे ते म्हणाले.