वेल्हे -वेल्हे तालुक्यात भटक्या कुत्र्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भटके कुत्रे अनेक वेळा चावा घेत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे घरोघरी लाल पाण्याने भरलेल्या बाटल्यांचा वापर सर्रास केला जात आहे.
दारात प्लास्टिकच्या बाटल्या ठेवल्यास कुत्री दारात येत नाहीत. असा येथील नागरिकांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घरोघरी दारात लाल बाटल्या किंवा इतर लाल सिग्नलचा वापर नागरिकांकडून कुत्र्यांना लांब थांबवण्यासाठी केला जात आहे.
भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापासून सुटका मिळण्यासाठी लाल सिग्नल ठेवण्याची अजब शक्कल लढवली जात आहे. याबाबत नागरिकांचा असा समज आहे, की या तांबड्या बाटल्या पाहून कुत्री घराच्या जवळ येत नाहीत, अशा फंडाबाबत विचारले असता. यामुळे लाल बाटल्यांची कुत्र्यांना भीती वाटते त्यामुळे कुत्री घराच्या आसपास फिरत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.