शिराळा : गेल दोन तीन दिवसापासून शिराळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. या मुळे पेठ (ता.वाळवा) येथील तीळगंगा नदीला पूर आला आहे. येथे तयार केलेला टायर बंधारा भरून वाहात आहे.
आनंदवन सामाजिक अभियान व उगम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी बाबा आमटे स्मृती टायर बंधारा बांधण्यात आला. केवळ साडेसहा लाख रुपयात निरोपयोगी टायरांचा वापर करुन हा बंधारा बांधण्यात आला. सुमारे 50 लाख लिटर पाणी साठवण याची क्षमता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.
महारोगी सेवा समिती, संपतराव पवार, श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर, तात्कालिन प्रांत राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील, नीळकंठ मांगलेकर, नितीन वारवडे यांच्या सह अनेकांनी या साठी आर्थिक मदत केली होती. या मुळे परिसरातील शंभर एकरावरील पिकांना या उपलब्ध पाण्याचा फायदा होणार आहे.
श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. इस्लामपूर म्हटले की पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित पतसंस्था म्हणून ओळखली जाते. राज्य पातळीवर, जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे. अश्या या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने जपले आहे. शिराळा येथील पूल गल्लीतील बोअरवेल, शिराळा ओढ्याच्या स्वच्छतेसाठी 25 हजाराची मदत, पेठ येथील तीळगंगा नदी वरील टायर बंधारा साठी पंचवीस हजार टायरसाठी दिले.
सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्या प्रयत्नातून हा बंधारा साकारला आहे. बाबा आमटे यांच्या नावाने हा बांधण्यात आला आहे. यासाठी अनेकांनी आर्थिक, श्रमदानाने सहकार्य केले आहे.