नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अखेर सत्ता स्थापनेचा दावा करत असून पुढच्या काही दिवसांत तालिबान अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान, तालिबान्यांच्या आजपर्यंतचा इतिहास हा क्रूरच असल्याचे जगाने पाहिले आहे. त्यावरूनच भारतातील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील तालिबान विषयी आपले मत व्यक्त केले आहे.
जावेद अख्तर यांनी यावेळी तालिबानवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंगदल या संघटनांवर देखील टीका केली आहे. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. हे बोलताना पुढे ते असेही म्हणाले की, आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान साऱखेच आहेत. राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या जावेद अख्तर यांनी देशातील एक मुस्लिम समुह देखील तालिबानचे समर्थन करतोय अस विधान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
जावेद अख्तर यांनी या विषयावर बोलताना अत्यंत स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे. तालिबान आणि तालिबान सारखे बनण्याची ईच्छा ठेवणारे सारखेच आहेत. देशातील काही मुस्लिम समाजातील एक गट तालिबानचे स्वागत करतोय, असे म्हणत त्यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्या लोकांवर टीका केली.
तसेच पुढे या मुलाखतीत ते म्हणाले की, जगभरातील उजव्या विचारसरणीचे लोक सारखेच आहेत. भारतात जमावाकडून होणाऱ्य़ा मारहाणीच्या घटनांबद्दल बोलताना अख्तर म्हणाले की, या घटना म्हणजे तालिबान बनण्याची फुल ड्रेस रिहर्सल आहे. हे लोक तालिबानच्या कृत्यांना स्विकारता आहे. हे सर्व एकच आहेत, फक्त नावाचा फरक आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आरएसअस, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांचे जे लोक समर्थन करतात, त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नक्कीच तालिबान हे मध्ययुगीन मानसिकतेचे समर्थन करणारं संघटन आहे, मात्र आपण ज्या लोकांना समर्थन करताय ते त्यापेक्षा वेगळे आहेत का? या लोकांची मानसिता तालिबान सारखीच आहेत.