मुंबई – राज्यातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. राज्यात आज 129 नवीन रुग्णांची भर पडली, तर 121 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यात शून्य करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे.
राज्यात आतापर्यंत 77,31,588 करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. राज्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1526 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 896 सक्रिय रुग्ण हे मुंबईत असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,72,867 करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.