बारामती/ जळोची -राज्यात संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह लहान मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
तसेच लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात तात्काळ राबवायचा आहे. त्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पवार यांनी आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, दुर्दैवाने आपल्या देशात लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अपेक्षित पुरवठा होत नाही. 45 वयाच्या वरील नागरिकांना लसीकरण देण्याचे धोरण केंद्र सरकारचे होते.
त्या-त्या राज्यातील 18 ते 44 वयोगटातील वर्गाला मोफत लसीकरण देण्याचे धोरण ठरविले होते. मात्र तेवढी पूर्तता होत नसल्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येत आहे. परदेशातील जी लस नागरिकांच्या दृष्टीने योग्य आहे. ती लस आणायची आणि देण्याची ही परवानगी द्यावी.