लोणंद – लोणंद (ता. खंडाळा) येथील लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेमध्ये बालचमूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यामध्ये उत्तम किल्ले बनविणाऱ्या स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये ओम सुतार, केतन कदम यांनी तयार केलेल्या किल्ल्याला प्रथम क्रमांक देण्यात आला. मृत्यूंजय प्रतिष्ठान, वेदांत क्षीरसागर, आदित्य, अथर्व, प्रणव आणि अनुराग यांच्या किल्ल्याला दुसरा तर नवी पेठ किल्ला ग्रुप, सोहम क्षीरसागर, मयूर क्षीरसागर यांच्या किल्ल्याला तिसरा क्रमांत देण्यात आला. तसेच ओम जेबले, कार्तिक सुपेकर, वेदांत पवार, आथर्व बोडके यांनाही प्रोत्साहनात्मक बक्षीसे देण्यात आली.
किल्ले स्पर्धेत रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधदुर्ग यासह अनेक किल्ले चिमुकल्यांनी साकारले. यंदाच्या दिवाळीत पावसाची रिमझिम असतानाही मुलांनी अतिशय मेहनत घेत खुप चांगला प्रतिसाद दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याचा सन्मान हा बालचमूंनी वेगवेगळ्या बनविलेल्या किल्ल्यातून दाखवून दिला.
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने 26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीपर आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमात घेण्यात येणार असल्याचे राजेश भाटिया यांनी सांगितले. किल्ले स्पर्धा घेण्याचे हे सलग अकरावे वर्ष आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकसवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेश भाटिया, दिनेश कुंभार, दीपक रामचंद्र क्षीरसागर, सुनिल बनकर, दत्तानाना क्षीरसागर, रामभाऊ काटकर, सागर घोडके, ऱोहित अग्रवाल, रवींद्र दिक्षित, संतोष पोटफोडे, रविंद्र जाधव, रवींद्र खरात, सोमनाथ शेलार, सुरेश शेलार, दत्ता क्षीरसागर, संतोष तोडकर, मेहुल भाटिया, अक्षय वाघमारे, श्रीकांत सापते, मनोज गुरुव, मयुर गुजर या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.