नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनू सिघवी यांनी तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासंबंधीच्या बाबींवर आपली बाजू मांडली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद करून उत्तर दिले. त्यानंतर लंचसाठी ब्रेक घेण्यात आला.
लंच ब्रेकच्या विश्रांतीनंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या वतीने नीरज कौल यांनी पुन्हा एकदा आपला युक्तिवाद सुरु. नीरज कौल राजेंद्र सिंग राणा आणि स्वामी प्रसाद मौर्य यांनी काही दाखले देण्यासाठी इतर प्रकरणातील निकाल वाचून दाखवले. पक्षाच्या फुटीबाबत निर्णयाचा अधिकार विधानसक्षा अध्यक्षांना नाही असा युक्तिवाद नीरज कौल यांनी यावेळी केल्याचे पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा १० व्या सूचीचा उल्लेख केला आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे.