नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनू सिघवी यांनी तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद केला गेला. यावेळी सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासंबंधीच्या बाबींवर आपली बाजू मांडली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद करून उत्तर दिले गेले.
अशातच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची एकीकडे सुनावणी सुरु असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना हल्लाबोल केला आहे.. ते म्हणाले,’मला आई भवानीवर विश्वास आहे, विजय आपलाच होईल’ शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केल. यावेळी ते म्हणाले,’अफझल खान यांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.
उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले,’आई भवानीचा आशीर्वाद असल्यानंतर कितीही अफझल खान आले, तरी मला पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झालीय. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. न्यायदेवतेवर आणि आई भवनाची माझा विश्वास आहे. दुर्गा भवानीच्या दर्शनाला मी येणार आहे, असंही त्यांनी म्हटल आहे.