नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरु असणारा हिंसाचार काही केल्या थांबताना दिसत नाही. त्यातच काल हिंसक जमावाने चक्क केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांचे घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतून मणिपूरमधील नागरिकांच्या संताप कोणत्या स्तरावर पोहचला आहे हे दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील इंफाळमध्ये काल रात्री जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली. सुदैवानी जमावाने घराला आग लावली त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. केंद्रीय मत्र्यांच्या घराव्यतिरिक्त आणखी दोन घरेही हल्लेखोरांनी पेटवली.
#WATCH | Manipur: A mob torched Union Minister of State for External Affairs RK Ranjan Singh's residence at Kongba in Imphal on Thursday late night. https://t.co/zItifvGwoG pic.twitter.com/LWAWiJnRwc
— ANI (@ANI) June 16, 2023
दरम्यान, या अगोदर दोन दिवस आधी 14 जून रोजी काही हल्लेखोरांनी इंफाळच्या लामफेलमधील महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत घरालाही आग लावली होती. 13 जून रोजी हिसांचारादरम्यान अचानक झालेल्या गोळीबारात 9 जण ठार झाले होते. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांनाही समाजकटंकानी आग लावली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथेही अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मणिपूरमधील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण आहे. राज्यातील 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. तर इंटरनेट सेवाही बंद आहेत. या सर्व परिस्थितीमुळे लोकांना रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.