मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. दरम्यान,राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. दरम्यान, यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यपाल विधानभवनात दाखल झाल्यावर पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यपाल रमेश बैस यांचे विधानभवनात आगमन झाल्यावर पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली.#Budget pic.twitter.com/9UDrcwwfdS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2023
राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारच्या विविध योजना आणि अभियानाविषयी अभिभाषणातून माहिती दिली. यावेळी त्यांनी,राज्य सरकारच्या सीमाभागतील लोकांसाठी विविध योजनेची माहिती दिली. तसेच 75 हजार युवकांसाठी नोकरभरती केली. राज्यात विविध क्षेत्रात भारती सुरू असून मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना अमलात आणणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, या अधिवेशात शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्थेविषयी झालेल्या गोंधळामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधकांचा समाचार घेऊ, असे थेट आव्हानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यांच्या या आव्हानामुळे आजपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.