नवी दिल्ली – महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, भाजपने या राज्यात गुंडांचे राज्य आणले आहे अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. महाराष्ट्रात राजकीय वैमनस्यातून सातत्याने होत असलेले गोळीबार, पत्रकारांच्या गाडीवर झालेले हल्ले यांचा संदर्भ देत खर्गे यांनी ही टीका केली आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये खर्गे यांनी म्हटले आहे की, भाजपने जनादेश चोरून स्थापन केलेल्या महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सांभाळता आलेली नाही. फेसबुक लाइव्हवर एका राजकारण्याची निर्घृण हत्या केली जात आहे. भाजप-आरएसएसच्या बेलगाम गुंडांकडून एका स्पष्टवक्त्या पत्रकारावर हल्ला केला जात आहे.
भाजपचा एक आमदार पोलिस ठाण्यात उघडपणे दुसऱ्या राजकारण्यावर गोळ्या झाडत आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. काँग्रेसने नेहमीच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखली आणि त्यामुळेच राज्याचा आर्थिक विकास शक्य झाला.
पण अंमलबजावणी संचालनालयाच्या बळावर स्थापन झालेले भाजप सरकार गुंडा राज पसरवून महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेशी खेळत आहे, असे काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले आहे.
भाजपा की चोरी से बनाई हुई महाराष्ट्र सरकार में क़ानून व्यवस्था ध्वस्त हो चुकी है।
▫️फेसबुक लाईव पर एक राजनेता की निर्मम हत्या हो रही है।
▫️एक मुखर पत्रकार पर BJP-RSS के उपद्रवी गुंडे हमला कर रहें हैं।
▫️एक भाजपा विधायक पुलिस स्टेशन में खुलेआम दूसरे राजनेता पर गोली चला…
— Mallikarjun Kharge (@kharge) February 10, 2024