पुणे -एप्रिल महिन्यातच यंदा सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ तापमानाचा पारा 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला आहे. यामुळे सर्वांची लाहीलाही होत आहे; पण याचबरोबर या उन्हाचा त्रास पशू-पक्ष्यांनाही होत आहे. याचा विचार करून त्यांच्यासाठी पाणवठे तयार करण्याची प्राधान्याने गरज आहे. पाण्याच्या शोधात पशू मानवी वस्त्यांकडे येत आहेत,
यावेळी रस्ता ओलांडताना भरधाव गाड्यांमध्ये त्यांचा बळी जात आह याचाही विचार करून सामाजिक संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन असे पाणवठे मोकळ्या जागेत, रस्त्यांच्या कडेला आणि राना-वनात करावेत, यासाठी दानशूर लोकांनीही पुढे येऊन काम करावे असे आवाहन प्राणी आणि पशूमित्र संघटनांनी केले आहे.