मुंबई – भारतात येत्या काळात युवा तसेच मुख्य ऑलिम्पिक आयोजित करण्याचे उद्दीष्ठ आहे, असे मत आयओसी सदस्य व रिलायन्स पाउंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना नीता अंबानी यांनी आयओसीच्या आगामी बैठक भारतात होण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यामुळेच तब्बल चार दशकांनंतर ही बैठक भारतात होत आहे. भविष्यात युवा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक खेळ भारतात आयोजित करण्याचे उद्दीष्ठ असून ही स्पर्धा आपणही यशस्वीपणे गेऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याचे स्वप्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुढील वर्षी मुंबईत ही बैठक होत असून भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी ही नव्या युगाची सुरुवात ठरेल, असेही त्या म्हणाल्या.