Shrinathji Temple and Ambani Family : अंबानी कुटुंब केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अंबानी कुटुंबाची व्यवसायासोबतच देवावरही गाढ श्रद्धा आहे हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे. अंबानी कुटुंब अनेक मंदिरांना भेट देताना दिसले आहे. मात्र, राजस्थानच्या मंदिरांशीही अंबानी कुटुंबाचे खास नाते आहे.
मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईतील सिद्धी विनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचतात. यासोबतच द्वारकाधीश मंदिरातही वेळोवेळी पोहोचत असतात. मात्र, हे कुटुंब राजस्थानमधील एका मंदिरातही जाते, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
राजसमंद जिल्ह्यातील श्रीनाथजी मंदिर –
हे मंदिर राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरात आहे. या मंदिराचे नाव श्रीनाथजी मंदिर आहे. या मंदिराचे अंबानी कुटुंबाच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. वाढदिवस, वर्धापन दिन किंवा नवीन सुरुवात करण्यापूर्वी अंबानी अनेकदा श्रीनाथजी मंदिराला भेट देतात.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांची सगाई याच मंदिरात झाली. यावरून अंबानी कुटुंबासाठी श्रीनाथजी मंदिराचे महत्त्व लक्षात येते. 2022 मध्ये श्रीनाथजी मंदिराला भेट दिल्यानंतर मुकेश अंबानी यांनी 5G सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर 5G सुरू करण्यात आली. एवढेच नाही तर 2015 मध्ये 4G सेवा सुरू झाली तेव्हाही मुकेश अंबानी दर्शनासाठी या मंदिरात पोहोचले होते.
या मंदिराचा इतिहास काय आहे?
1665 मध्ये वृंदावनजवळील गोवर्धन येथून श्रीनाथजींची मूर्ती राजस्थानात आणण्यात आली होती, असे सांगितले जाते. ही मूर्ती मेवाडमध्ये आणण्यासाठी 32 महिने लागले. या मंदिरामागील रंजक कथा अशी आहे की, जेव्हा देवाची मूर्ती नेली जात होती तेव्हा रथाचे चाक या सिहार नावाच्या ठिकाणी अडकले होते. अनेक प्रयत्न करूनही ते निघाले नाही, तेव्हा दैवी संकेत मानून तेथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तेच हे श्रीनाथजी मंदिर.