– राजेंद्र वाघमारे
नेवासा – मुळा व जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागणीला शासनदरबारी ५० वर्ष उलटूनही समस्या जैथे थेच असल्यामुळे नेमकी दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न जिल्हा धरणग्रस्त कृती समितीचे समन्वयक दिगंबर आवारे यांच्या समोर उभा ठाकला आहे. धरणग्रस्तांच्या मागणीचा पाठपुरावा सातत्याने शासनदरबारी करुनही गेंड्याची कातडी परिधान केलेल्या अधिकाऱ्यांना जाग येत नसल्यामुळे नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांनीच याबाबत आवाज उठवावा अशी मागणी आवारे यांनी प्रस्तृत प्रतिनिधींशी बोलतांना केली.
यावेळी बोलतांना आवारे म्हणाले की, मुळा आणि जायकवाडी या दोन्ही धरणांना ५० वर्ष पुर्ण झालेले असतांना धरणग्रस्तांचे प्रश्न आजही कायम आहेत याप्रश्नाकडे अधिकारी ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे धरणग्रस्तांच्या समस्या कधी मिटणार असा यक्ष सवाल निर्माण झालेला आहे.
पुर्नसन जमीनी १५ दिवसात वर्ग करण्याच्या शासनाच्या सुचनेला तिलांजली दिली दिलेली असतांनाच नेवासा – शेवंगांव तालुक्यातील १२०० धरणग्रस्तांना पुर्नवसन जमीनी मिळालेल्या नाहीत पुर्नवसन विभागाने संपादित केलेल्या जमीनीचे ६५ टक्के चलन भरल्याचा पुरावा शासन मागत आहे. त्यामुळे या जमीनी वाटप बंद असल्याचे असल्याचे संबंधित अधिकारी सांगत असल्याची माहीती जिल्हा धरणग्रस्त कृती समितीचे समन्वयक दिगंबर आवारे यांनी यावेळी बोलतांना दिली.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, शासनाच्या जमीन वाटप रजिस्टरला लाभार्थ्यांची नांवे आहेत काही बेरोजगारीमुळे स्थलांतरीत झालेले आहे तरी काही मयत झालेली असल्यामुळे तिसरी पिढी आता शासनाचे चलन भरण्यास तयार आहे. माञ संबंधित पुर्नवसन अधिकारी भरुन घेत नसल्यामुळे धरणग्रस्तांसाठी संपादित केलेल्या ७/१२ उताऱ्यावर जिल्हा पुर्नवसन अधिकाऱ्यांचेच नांव आहे व त्याचा मुळ ताबा पुर्वीच्याच मालकाकडे आहे.
तरी शासनाने कब्जाहक्क रक्कम भरुन सदर उताऱ्यास नांव लावण्याची मागणी आवारे यांनी शासनदरबारी केली आहे. माञ संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या समस्या जैसे थेच कागदावर जशाच्या तशा पडून आहेत. या समस्याला वाचा फोडण्यासाठी नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांनी आवाज उठवून धरणग्रस्तांना न्याया द्यावा अशी मागणी कृती समितीचे समन्वयक आवारे यांनी यावेळी बोलतांना दिली.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे जिल्हा धरणग्रस्त कृती समितीचे समन्वयक दिगंबर आवारे यांनी ही समस्या मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. माञ कागद पे कागद आणि संबंधित अधिकारी ‘वजन’ मुळे दुर्लक्ष करीत असल्याने धरणग्रस्तांना नेमका न्याय कधी भेटणार असा सवाल सध्या निर्माण झालेला आहे. याबाबत खासदार लोखंडे यांच्यासह धरणग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांची भेट घेवून अधिकाऱ्यांबाबत तक्रार करणार असल्याचे आवारे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.