मंचर – आंबेगाव तालुक्यात मोठ्य प्रमाणात धुके पडत असल्याने शेती पिकांवर आलेल्या रोगराईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. धुक्यामुळे पिकांवरील रोगराई वाढल्याने तरकारी पिकांवरील औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. सध्याच्या धुक्यांमुळे तरकारी पिकांसह कांदा पिकावरही रोगराई वाढली आहे.
कांदा पिकाची मागील दहा ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांनी दोन वेळा फवारणी केली आहे. अजूनही धुके पडत असल्याने पुढील दिवसांतही फवारणी करावी लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढला आहे. पहाटे प्रवास करताना वाहनांनाही लाईट लावूनच प्रवास करावा लागत आहे.
धुक्याची चादर सकाळी साडेआठपर्यंत असल्याने धुके पाहण्याचा आनंद शहरी भागातील नागरिक घेत आहेत; परंतु शेतकऱ्यां फवारणीचा खर्च झाल्याने आर्थिक फटका बसत आहे, अशी माहिती निसर्गप्रेमी श्रीराम क्षीरसागर यांनी दिली.