ठाणे – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे लोकांचा आवाज दाबून टाकणारे सरकार नाही, मात्र मागचे फडणवीस सरकार मात्र लोकांचा आवाज दाबून टाकण्याचा सतत प्रयत्न करीत होते असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
कॉंग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रात सावरकर यांच्यावर टीका करणारा लेख प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे त्या मुखपत्रावर बंदी घालावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे त्यावर प्रतिक्रीया विचारली असता श्रीमती सुळे म्हणाल्या की फडणवीस यांना त्यांचे मते व्यक्त करण्याचा पुर्ण अधिकार आहे.
राज्यातील आघाडी सरकार लोकांना त्यांची मते मोकळेपणाने मांडण्यास मोकळीक देत आहे. त्यांनी लोकांचा आवाजच दाबून टाकण्याचा प्रयत्न कधी केला नाही असेही त्या म्हणाल्या. मात्र फडणवीस यांनी केलेल्या बंदीच्या मागणीवर मात्र सुप्रियांनी अधिक भाष्य करणे टाळले.