राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रांची वर्णी लागणार
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या सत्ता स्थापनाच्या नाट्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चर्चेचा केंद्रस्थानी आले होते. त्यानंतर मध्यरात्री राष्ट्रपती राजवट उठवित फडणवीस यांना शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्याने राज्यपालांवर टीकाही झाली होती.
त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार त्यांची उचलबांगडी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या कलराज मिश्र यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आणण्याची अटकळ बांधली जात आहे.
हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालपदानंतर कलराज मिश्र यांची 9 सप्टेंबरला राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशाचे ज्येष्ठ नेते असणारे मिश्र राज्य आणि केंद्रीय मंत्रीपदी होते.
मिश्र राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मिश्र यांनी उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. दरम्यान, राज्यातली सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपने प्रतिमा संवर्धनासाठी हा खटाटोप चालवल्याचीही चर्चा आहे.