मुंबई – पोलिसांनी आता अॅक्शन मोडमध्ये यावे. मा. उच्च न्यायालयाचा निकाल हा १४४ नुसार कायदा म्हणून पाहिला जातो. स्पष्टपणे जरांगेंना हाजीर हो, म्हणून न्यायालयाने सांगितले आहे. तर आता सरकारचा आदेश नाही, तर मा. उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे जरांगेंना कायदेशीर रित्या मोर्चा काढावा लागेल. जर तो नसेल तर कारवाई निश्चित होईल, असे प्रतिपादन गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे.
सदावर्ते पुढे म्हणाले की, आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर अर्ज असेल तर पायी मोर्च्याला काहीच अडचण नाही. पण बेकायदेशीरपणे मुंबईकडे धडकणार असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा थांबवायचा आहे. कारण कायदा मोठा आहे. जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत.
सरकारचे धोरण मायबापाचे
सरकार हतबल झाले का, असे सदावर्ते यांना विचारल्यानंतर सदावर्ते म्हणाले की, सरकारचे धोरण मायबाप धोरण आहे. पोलिस कारवाई का करत नाही. तर पोलिसांचे मनोबल कमी होण्यात सरकारचे दोन मंत्री वाटले गेले आहे. हे पोलिसांना कारवाई करू देत नाही. सामान्य पोलिस धारातीर्थ होतात. पोलिसांचे मनोबल हतबल झाले. पोलिसांचे हतबल होण्याची बाब म्हणजे राजकारणी आहेत, असेही ते म्हणाले.