युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला संताप
मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या मुद्द्यावरुन ट्विटवर #AareyForest हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. अनेकांनी यासंदर्भात आपला आक्षेप नोंदवला आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही ट्विट करुन या कारवाईचा विरोध केला आहे. आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे. ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे कॉलनीतील झाडं तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवे. येथील झाडं तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले तर अधिक बरं होईल ना?, अशी टिका आदित्य यांनी ट्विटवरुन केली आहे.
The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and swiftly cutting down an ecosystem in Aarey is shameful and disgusting. How about posting these officials in PoK, giving them charge to destroy terror camps rather than trees?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोड करण्याचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे, असे आदित्य यांनी म्हटले आहे.
Many environmentalists and even many local Shiv Sena members from the vicinity have tried stopping this. More so the increased police presence and the way this deforestation is happening, @MumbaiMetro3 is destroying everything India said at the UN @UNEnvironment @UN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
आदित्य यांनी केंद्र सराकरवर निशाणा साधला असून पर्यावरण संवर्धनावर बोलण्याचा केंद्र सरकारला काहीच अधिकार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पर्यावरणसंदर्भातील समस्या, प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण यासारख्या गोष्टींवर केंद्र सरकारने बोलण्यात काहीच अर्थ नाही.
There’s no point for the Central government ministry of climate change to exist, or to speak about plastic pollution when the @MumbaiMetro3 senselessly destroys the Aarey vicinity. This ego battle taken up by Metro 3 is destroying the purpose of making it.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
मुंबई मेट्रो प्रकल्पामुळे आरेच्या वनक्षेत्राचे नुकसान होत आहे. ही लढाई अहंकाराची लढाई असल्यासारखे काम मेट्रोकडून केले जात असल्याने या मेट्रोचा मूळ उद्देशच संपला आहे, असे आदित्य म्हणाले आहेत.