वाराणसी -उत्तरप्रदेशातील लोकांना विद्यमान राज्य सरकार पुर्ण पसंत असून हेच सरकार कायम राहावे यासाठी जनताच प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.वाराणसीतील खजुरी गावातल्या प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
विरोधकांना माझ्या विषयी तिरस्कार असल्यामुळेच सरकारच्या जनहिताच्या कामाचीही टिंगल करतात. केवळ आपल्या विरोधासाठी ते स्वच्छ भारत अभियानालाही विरोध करतात असे ते म्हणाले.
युक्रेनच्या मुद्द्यावरही विरोधक राजकारण करून विरोधकांचे नेते या विषयीच्या अडचणीत भरच घालत आहेत, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाने खादीपासून वर्षानुवर्षे राजकीय फायदा मिळवला. मात्र आमच्या सरकारने खादी आणि योगाला आंतरराष्ट्रीय ब्रॅंड बनवल्याचा दावाही मोदींनी केला.