लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता येणार हे नक्की असले तरी 3 मेपर्यंत रात्री उशीरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही आदेश काढला नव्हता. रात्री उशीरा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला. त्यात कन्टेमेंट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून सर्व दुकाने सुरू सोमवारपासून सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे मात्र मुलत्वांचे पालन करणे बंधनकारक असून, एकल दुकानेच फक्त सुरू करता येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा आदेश सकाळी नगरकरांच्या हातात पडला. पण त्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अनेक व्यावसायिकांनी दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी कोणी दुकाने उघडली. ती पोलिसांनी बंद केली. त्यामुळे पुन्हा व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने नगर शहरासह उपनगरातील अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने देखील बंद होती. काय सुरू राहणार आणि कशावर बंदी हे पुढीलप्रमाणे आहे.
हे सुरू राहिल कृषी –
शेतीमाल खरेदी विक्री, बाजार समित्या, कृषी उपकरणे, यंत्रे बनविणारे दुकाने व कारखाने, शेतीमाल वाहतूक व विक्री बियाणे, खते किटकनाशकांची विक्री सुरू राहिल. आस्थापना- शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार 33 टक्केपर्यंत उपस्थिती राहिल, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, माहिती तंत्रज्ञान व त्यावर आधारीत सेवा सुरू राहतील, कोल्ड स्ट्रोरेज, वेअर हाऊसेस, खाजगी सुरक्षा सेवा, इमारतींच देखभालीसाठी, सहाय्यभूत ठरणार व्यवस्थापन सुविधा सुरू राहतील,महापालिका नगरपालिका हद्दीतील बाजारपेठा व बाजार संकुलात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सुरू राहतील. महापालिका नगरपालिका हद्दीतील एकल वसाहतीतील लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरू राहतील. तथापि आशा भागात एखाद्या गल्लीत रस्त्यालगत 5 पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी जीवनाश्यक वस्तूूंची विक्री करणारीच दुकाने सुरू राहितील. ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने सुरू राहतील. दुकानासमोर गर्दी दिसल्यास दुकान सील केले जाईल. सार्वजनिक सुविधा- डिझेल विक्री 24 तास. पेट्रोल विक्री सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. दुष्काळ टंचाई निवारणाची कामे सुरू राहितील, शासकीय निमशासकीय कार्यालये सुरू राहतील, अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 10 व्यक्तींनाच परवानगी, प्रसार माध्यमांचे कार्यालये सुरू राहतील, चिक्स, चिकण, अंडी, दुकाने सुरू राहतील, पशूवैद्यकीय दवाखाने, औषाधालये. वाहतूक – सर्व वस्तू व मालाची वाहतूक करता येईल. रेल्वेव्दारे वस्तू माल पार्सल यांची ने आण करता येईल. सर्वप्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणारा ट्रक व तसम वाहने हे वाहतूक करताना दोन चालक एक हेल्पर यांच्या सोबत वाहतूक करतील. तसेच माल वस्तू पोहोच केल्यानंतर रिकाम्या झालेल्या वाहनांना देखील वाहतूकीसाठी परवानगी असेल. ट्रक व तसम व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाची दूरुस्ती करणारी दुकाने सुरू राहतील, तथापि संबंधितांना केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. रेल्वे वाहतूकीच्या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी व कर्मचारी कंत्राटी कामगार यांना संबंधित अस्थापना यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल. अत्यावश्यक सेवांकरिता चारचाकी वाहनांमध्ये केवळ वाहन चालक व इतर दोन व्यक्ती यांना परवानगी राहील, तसेच दुचाकी वाहनांसाठी केवळ वाहन चालकांनाच परवानगी राहिल. उद्योग- ग्रामीण भागात सामाजिक अंतर ठेऊन उद्योग सुरू करता येतील.
मोहोज देवढे परिसर सील
घशातील स्त्राव पुणे येथील लष्करी आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. ते सर्व निगेटीव्ह आल्याने तालुक्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे. निगेटिव्ह आलेल्या 25 नागरिकांना प्रशासनाने पाथर्डी येथील गायछाप कारखान्याजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पुढील 14 दिवसांसाठी ‘क्वारंटाईन’ केले आहे.मोहज देवढे येथे करोनाबाधित रुग्ण आढल्यानंतर प्रशासनाकडून सतर्कता पाळली जात आहे. मोहोज देवढे अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी, हाकेवाडी, रुपनरवाडी, बहिरवाडी हा संपूर्ण परिसर 10 मे पर्यंत प्रशासनाकडून सिल करण्यात आला आहे. या परिसराला जोडणारे सर्व रस्ते दगड, काट्या टाकून बंद करण्यात आले आहेत. पाथर्डीकडून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाचे मुख्य प्रवेशद्वार बांबूचा अडथळा बांधून बंद करण्यात आले आहे. गावातून बाहेर जाण्यास व गावात येण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मोहज देवढे गाव सिल केल्यानंतर ऊस तोडणीवरून आलेले काही कामगारांना गावाबाहेर शेतात पाल टाकून राहावे लागत आहे. बंद काळात त्यांना अत्यावश्यक वस्तूंची मदत ग्रामस्थांकडून केली जात असल्याचे सरपंच गणेश चितळकर यांनी सांगितले.
उसतोडणी कामगारात सौम्य लक्षणे
तालुक्यातील फुंदेटाकळी येथील एका उसतोडणी कामगाराला सौम्य लक्षणे आढळल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली. संबंधित ऊसतोडणी कामगार पुणे जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेला होता. तेथून आल्यानंतर प्रशासनाकडून त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आज अचानक त्रास जाणवू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
संपर्कातील 37 पैकी 33…
एकही करोनाबाधित रुग्ण आढळा नव्हता. मात्र, पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील 45 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने चे स्पष्ट झाले. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेली होती. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 44 झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहज देवडे हे प्रशासनाने सात दिवस सील करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 559 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 481 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजच्या बाधीत रुग्णामध्ये आता करोना बाधिताची संख्या 44 झाली आहे. त्यापैकी 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे. त्यापैकी एक जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहे तर 2 बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आणि परराज्यातून नगर जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे अधिक दक्षतेने जिल्हा सीमेवर तपासणी करण्यात येत आहे.
निर्देशांक 2 हजार अंकानी कोसळला
अंकांनी कोसळून 31,715 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक नेफ्टी 5.7 टक्क्यानी म्हणजे 566 अंकांनी कोसळून 9,293 अंकांवर बंद झाला. निर्देशांक एवढ्या मोठ्या प्राणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे आज एकाच दिवसात 5.82 लाख कोटी रुपयाचे नुकासन झाले. बॅंका, वाहन, धातू आणि रिऍल्टी क्षेत्राचे आज जास्त नुकसान झाले. या क्षेत्राचे निर्देशांक 6 ते 8 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. लॉक डाऊनमुळे या तिमाहीत कंपन्यांचा नफा कमी होईल असे गुंतवणूकदारांना वाटते. भारतीय शेअर बाजाराचा अस्थिरता निर्देशांक 28 टक्क्यानी वाढून 44 वर गेला. बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांकात 6.8 टक्क्यांनी कमी झाला. याबाबत विश्लेषकांनी सांगितले की लॉक डाऊनमुळे सर्व उद्योगांचे आणि ग्राहकांचे कामकाज ठप्प झाल्यामुळे कर्ज वसुलीवर परिणाम होऊन बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्यांची एप्रिल महिन्यातील विक्री शून्यावर गेली आहे. त्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली. आज झालेल्या जोरदार विक्रीचा छोट्या कंपन्यांच्या शेअरवरही परिणाम झाला. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा मिडकॅप 4.4 टक्क्यांनी कोसळला तर स्मॉल कॅप 3.2 टक्क्यांनी कोसळल्याचे दिसून आले. निफ्टीशी संबंधित 50 पैकी 48 कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज घट झाली. सरकारी आणि खासगी बॅंकांच्या शेअर्सचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आज झालेल्या निर्देशांकाच्या पडझडीत बॅंकांचा वाटा निम्मा राहिला. विक्रीचा जोर इतका इतका होता की, राष्ट्रीय शेअर बाजारातील 1438 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर केवळ 386 कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली.
सरकारी भरती बंद
बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करुन, काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत. याचा सर्वात फटका नव्या नोकरभरतीला बसणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या काळात रखडलेली 72 हजार जागांची भरती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र करोना संकटामुळे ही भरती रखडली आहे. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थविभागाने दिले आहेत. अर्थविभागाच्या आदेशानुसार जी कामं सध्या चालू आहेत, ती स्थगित करण्यात येणार आहेत. तसेच नवीन कामांचे प्रस्तावही सादर करता येणार नाही. प्रत्येक विभागाला 33 टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. राज्य सरकार आयोजित जे जे कार्यक्रम असतात ते सुद्धा आता रद्द करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. मात्र त्याला आता कात्री लावण्यात आली आहे. लॉकडाऊनद्वारे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या कर आणि करेतर महसुलात घट होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. राज्याची आर्थिक घडी दोन-तीन महिन्यातही अशीच राहण्याची शक्यता आहे. यावर तत्काळ उपाययोजना म्हणून सर्व निवडून आलेले लोक प्रतिनिधी तसेच शासकीय, निमशासकीय, विद्यापीठ यांसह सर्व अनुदानित संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी (गट ड कर्मचारी वगळून) यांना मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नगरमधील शिवभोजन केंद्राचा…
नावाखाली डुप्लिकेट फोटो अपलोड करण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे खरे गरजु अन्नापासून वंचित राहत आहेत, अशी तक्रार जगताप यांनी भुजबळ यांच्याकडे केली आहे.
सचिवांना दिल्या चौकशीच्या सूचना
नगर जिल्ह्यातील अनागोंदी कारभाराविषयी तातडीने चौकशी करा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सचिवांना दिल्या आहेत, असे सांगून जगताप म्हणाले. “”या संदर्भात आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत. ते घेऊन वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहोत, स्वस्त धान्य दुकानांतून होणाऱ्या धान्यवितरणातही मोठा गफला आहे. राष्ट्रीय महामारीच्या संकटात, असे प्रकार घडत असल्याने त्याचे अधिक दु:ख वाटते. लॉकडाऊनमुळे गरिबांना खायला अन्न नाही, अशावेळी तरी दुकानदारांनी किमान आठ तास दुकाने उघडी ठेवून सहकार्य करायला हवे. दोन तासांत ती बंद केली जातात. त्यामुळे गरजूंना धान्यापासून वंचित ठेवले जात आहे, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे जगताप म्हणाले.
तरूणाच्या हत्येला नाजूक किनार
संशयिताला ताब्यात घेतले. या संशयित व्यक्तीची पोलीस कसून चौकशी करीत मअसून या व्यक्तीकडून संपूर्ण गुन्ह्याची आणि त्यामागील कारणाची उकल होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर, या हत्येमध्ये किती आरोपींचा समावेश आहे, याचाही छडा लावण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा हत्येमध्ये सहभाग असल्याचा अंदाज आहे. मृत मुकुंदच्या गुप्तांगावरही वार करण्यात आल्याने हे हत्याकांड अनैतिक संबंधाच्या रागातूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. दरम्यान, या प्रकरणातील महत्वाचे धागे-दोरे पोलिसांच्या हाती लागले असून लवकरच या हत्येचा छडा लागणार असल्याची माहिती समजली. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी श्रीगोंद्यात पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. हत्येच्या प्रकरणाला नाजुक कारण असल्याचा दुजोरा दिला. या प्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे (रा.चाहुरमळा, आढळगाव) आरोपीला अटक केली आहे.