मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या पीकाला हमीभाव, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, सीमावाद यांसह विविध मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. राज्य विधीमंडळाचे शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
दरम्यान, अश्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. राजू शेट्टी यांनी आपल्या ट्विट मधून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षावर चांगलाच हल्लाबोल केल्याचं दिसून आलं आहे. “लबाड लांडगं ढाँग करतंय ! दिवसा वीजेच साँग करतंय !!’ या आशयाचे ट्विट केलं आहे.
राजू शेट्टी यांचं ट्विट..!
लबाड लांडगं ढाँग करतंय !
दिवसा वीजेच साँग करतंय !!#शेतकरी#शेतकरीदिवसावीज @epunyanagari @pudharionline @lokmat @ANI @abpmajhatv @SakalMediaNews @IndianExpress @LoksattaLive @zee24taasnews @timesofindia @SarkarnamaNews @JaiMaharashtraN @bbcnewsmarathi @saamTVnews @PTI_News pic.twitter.com/TJGbS6mpst— Raju Shetti (@rajushetti) March 2, 2023
लबाड लांडगं ढाँग करतंय ! दिवसा वीजेच साँग करतंय !! महाविकास आघाडी सत्तेत असताना माझ्यासह हजारो शेतकरी शेतकऱ्यांनी दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर 14 दिवस कचरा कुंडाजवळ ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी सत्तेच्या खुचीवर बसलेल्यांना दिवसा वीज देण्याची सदबुध्दी का देवाने दिली नाही,
तेव्हा यांच्या दिवसा वीजेचा करंट कुठे गेला होता ? आणि आताचे सत्ताधारी तेव्हा शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या म्हणून सभागृहात आमच्या बाजूने थयथयाट करून सत्ताधारी यांना 440 चा करंट देत होते आता मात्र सत्तेत आल्यावर या प्रश्नाबाबत त्यांचीही फ्यूज उडाली आहे.सत्तेत खुची मिळेपर्यत विरोधी पक्षच शेतकऱ्यांचा परमनंट सोबती.!’