नवी दिल्ली – परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाने 8 मे पासून “ऑपरेशन समुद्र सेतू’ सुरू केले आहे. या अभियानाच्या पुढच्या टप्प्यात, भारतीय नौदलाचे “शार्दूल’ या जहाजावरून इराणच्या “अब्बास’ बंदरातून भारतीय नागरिकांना गुजरातच्या पोरबंदरला आणले जात आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यासाठी यादी तयार केली असून प्रवासापूर्वी त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली गेली.
“आयएनएस शार्दूल’वर अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, आरोग्यशास्त्रज्ञ, पोषणतज्ज्ञ, वैद्यकीय दुकाने, शिधा, वैयक्तिक संरक्षक उपकरणे, फेस-मास्क, जीवनरक्षक जॅकेट इत्यादींची या जहाजावर विशेष तरतूद करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त, कोविड-19चा सामना करण्यासाठी अधिकृत विशिष्ट वैद्यकीय उपकरणे, तसेच सध्याच्या कोविड-19 संकटादरम्यान भारतीय नौदलाने विकसित केलेली नावीन्यपूर्ण उत्पादने देखील जहाजावर तैनात करण्यात आली आहेत.
पोरबंदर येथे उतरल्यानंतर, या सर्व प्रवाशांना राज्य प्रशासनाच्या देखरेखीखाली देण्यात येईल.
भारतीय नौदलाच्या “जलाश्व’ व “मगर’ या जहाजांनी मालदीव तसेच श्रीलंका येथून आतापर्यंत 2874 लोकांना कोची व तुतीकोरिन बंदरात आणले आहे.