नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत बिअरच्या विक्रीत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे, परंतु त्याच वेळी त्याचा वृद्धी दर प्रत्येक तिमाहीत खाली आला आहे. अनेक राज्यात दारूवर बंदी असल्यामुळे वृद्धी दर कमी झाला आहे.
नोटाबंदी आगोदर बिअरची विक्री वार्षिक 10 टक्के वाढीने होत होती. 2018 मध्ये ती घसरून 5.7 टक्क्यांवर आली. तर 2019 मध्ये 6.9 टक्क्यांवर गेली .
ग्लोबल डेटा कंपनीच्या अहवालानुसार गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत बिअरची विक्री चांगली झाली. लोकसभेच्या निवडणुका आणि आयपीएलमुळे बिअरची खप चांगला होता. पण सहा महिन्यांनंतर पुन्हा विक्रीत घसरण झाली.
आंध्र प्रदेशात बारची संख्या 40 टक्क्यांनी कमी झाल्याने आणि देशातील मान्सून लांबल्याने विक्रीत घट पाहायला मिळाली. मागील वर्षी एप्रिल ते जून या काळात बिअरची विक्री सर्वाधिक 45 टक्के होती. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ या अनेक राज्यांनी बियरवरील करात मोठी वाढ केल्यामुळे विक्रीत घट झाली.
भारतातील बिअरचा वार्षिक वापर प्रति व्यक्ती दोन लिटर आहे. हा जगातील सर्वात कमी खप हे आहे. बिअर उत्पादकांना विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. देशातील आर्थिक मंदीमुळे बिअरच्या विक्रीत घट झाली आहे.