Sonam Wangchuk Hunger Strike| लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी 21 दिवसानंतर त्यांचं उपोषण सोडलं आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. 21 दिवस उपोषण केल्यानंतर मंगळवारी वांगचुक यांनी उपोषण सोडताना आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, ‘मी लडाखच्या घटनात्मक रक्षणासाठी आणि लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढत राहीन. यानंतर आता महिलांचा एक गट 27 मार्चपासून 10 दिवस उपोषण करणार आहे. लडाखचा सहाव्या अनुसूचीत समावेश करून त्याला राज्याचा दर्जा द्यावा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या संदर्भात वांगचुक यांनी 21 दिवस उपोषण केले. 6 मार्चपासून सुरू झालेले त्यांचे उपोषण 26 मार्चला संपले. यावेळी त्यांना देशभरातील लोकांचा पाठिंबा मिळाला. मागील 21 दिवसांपासून ते पाणी आणि मीठाचे सेवन करत होते.
सोनम वांचुक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहनही केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांची तब्येत खूपच खालावली दिसत आहे. त्यांनी लडाखच्या लोकांना राष्ट्रहितासाठी यावेळी अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.
21st Day OF MY #CLIMATEFAST
350 people slept in – 10 °C. 5000 people in the day here.
But still not a word from the government.
We need statesmen of integrity, farsightedness & wisdom in this country & not just shortsighted characterless politicians. And I very much hope that… pic.twitter.com/X06OmiG2ZG— Sonam Wangchuk (@Wangchuk66) March 26, 2024
सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात लडाखच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. वांगचुक म्हणाले की, मोदी हे प्रभू रामाचे भक्त आहेत. त्यांनी त्यांच्या ‘प्राण जाए पर वचन न जाये’ या शिकवणीचे पालन केले पाहिजे. गेल्या 20 दिवसांत लडाखमधील 3 लाख रहिवाशांपैकी सुमारे 60,000 लोकांनी उपोषणात भाग घेतला आणि त्यांच्या वेदना मांडल्या, परंतु या सरकारकडून काहीही बोलले गेले नाही.’
लडाखबाबत सोनम वांगचुक यांच्या मागण्या कोणत्या? Sonam Wangchuk Hunger Strike|
लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा, लडाखमध्ये स्थानिक लोकांसाठी विशेष जमीन आणि नोकरीचा हक्क द्यावा, लडाखमध्ये लोकसेवा आयोग स्थापन करावे आणि लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र लोकसभेच्या जागांचीही मागणीही करण्यात आली आहे.
हेही वाचा:
शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं,’1990 सालापासून आम्ही भाजपचा खासदार निवडून दिलाय…’