पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या गुन्ह्यातीला आरोपींना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुणे-मुंबई येथील अनेक नागरिक कुटुंबियांसह गावी गेले आहेत. पोलीस बंदोबस्तात मग्न आहेत. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून पुन्हा घरफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चोरांच्या देण्यात आलेल्या पॅरोलचा फेरविचार करावा, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव ऍड. सुहास फराडे यांनी ट्विटरवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
सात वर्षाच्या आतमध्ये शिक्षा असलेल्या आरोपींना पॅरोलवर जेलमधून सोडण्यात आले आहे. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी या निकषमध्ये बसतात. त्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. अनेक मुंबई, पुणेकर कुटुंबियांसह गावी गेले आहेत. फ्लॅट, घरे मोकळी असून, अशा जामीन मिळालेल्या चोरांकडून गुन्हे होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा नागरिक माघारी पुन्हा शहरात येतील, त्यावेळी या घडलेल्या घटना उघडकीस येतील. त्यामुळे अशा चोरांना दिलेल्या पॅरोलबाबत विचार करावा, अशी मागणी ऍड. फराडे यांनी या ट्विटवरून केली आहे.