मुंबई – कर्नाटक राज्यात हिजाब वापरण्यावरून चिघळलेले प्रकरण अतिशय गंभीर आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आपले मत व्यक्त केले. डोक्यावर पदर ठेवणे अथवा दुपट्टा घेणे, हिजाब घालणे म्हणजे तोंड लपवणे नाही, हिजाब आणि बुरख्यात अंतर आहे असे नवाब मलिक म्हणाले.
भाजपचे लोक हे कारस्थान रचत आहेत. यात लहान मुलांमध्ये जी मानसिकता तयार करत आहेत ती धोकादायक आहे. यातून केवळ देशाचे नुकसान होणार आहे, अशी भीती मलिक यांनी व्यक्त केली.
भाजपला उत्तर प्रदेश निवडणुकीत फायदा यामुळे होईल असे वाटत असेल, पण हा विषय राजकारणाच्या पुढचा आहे. देशात दुफळी तयार होऊ नये, कोणाचीही मन दुखवले जाऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे असे मलिक म्हणाले.
कर्नाटकमध्ये योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फायदा निवडणुकीत घेण्याचे भाजपाचे काम सुरू आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.